नाथमाधव यांचे सोनेरी टोळी हे पुस्तक वाचकाला गुंतवून ठेवणारे किंवा खिळवून ठेवणारे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरवातीपासून च प्रत्येक क्षणी एक नवीन धक्का आपल्याला चकित करून टाकतो. यातील प्रत्येक गोष्ट अगदी रंगवून आणि खुलवून सांगितली आहे. रायाक्लब आणि त्याच्या वेगवेगळ्या करामती म्हणजे थक्क करणारा नमुना आहे. इंग्लिश लेखक शेरलॉक होम्स जश्या कथा लिहीत असेल तश्या दर्जाची रहस्यमय आणि उत्कंठावर्धक अशी कादंबरी आहे . या कादंबरीच्या निमित्ताने माणसांचे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय ठकसेनचे वेगवेगळे प्रकार त्यांच्या फसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सुद्धा तपशीलवार पने कळून येतात. माणसातील राग लोभ सुख दुःख आनंद या भावनांचे यात दर्शन होते माणूस कसा मोहाला बळी पडतो हे ही यात दिसून येते.
आणि हे सगळे वाचताना आपण अगदी गुंग होऊन जातो. प्रत्येक प्रसंग संपला की पुढे काय होईल याची सतत उत्कंठा लागून राहते. कथेतील वाचकांचा रस टिकवून ठेवणे हेच या कादंबरीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल
आणि हे सगळे वाचताना आपण अगदी गुंग होऊन जातो. प्रत्येक प्रसंग संपला की पुढे काय होईल याची सतत उत्कंठा लागून राहते. कथेतील वाचकांचा रस टिकवून ठेवणे हेच या कादंबरीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल
No comments:
Post a Comment