Monday, July 18, 2016

अभ्यास सहल

      अभ्यास सहल म्हणजे मजा मस्करी शिकणे सगळेच काही असते.  आमचे शिक्षक त्यांच्या ग्रुप बरोबर ईशान्य भारत येथे  गेले होते तो प्रसंग त्यांनी आम्हाला सांगितला होता. तो प्रसंग अगदी त्यांच्या शब्दात इथे देत आहे.
    आमचा एक ग्रुप अभ्यास सहली साठी ईशान्य भारत येथे जाणार असे ठरले.या सहलीमुळे आमची आयुष्ये बदलतील असे आम्हाला वाटले ही नव्हते.   आम्ही सगळे फार उत्साहित होतो. तिथे गेल्यावर आमचे वेगवेगळे ग्रुप पाडून आम्हाला वेगवेगळ्या गावी पाठवण्यात येणार होते. इथून निघताना काही फार माहिती नव्हती आम्हाला की तिकडे कसे आणि कोणते अनुभव आम्हाला येणार आहेत. असाच एक थरारक अनुभव आमची तिथे वाट बघत होता.
        आम्ही मुंबईतून निघालो आणि मजल दरमजल करत नॉर्थ इस्ट च्या आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोचलो. तिथे भारतातून वेगवेळ्या राज्यातून माणसे अभ्यास सहलीसाठी आली होती. सगळ्या राज्यातील माणसांचे मिळून गट पडले गेले आणि आम्हाला नॉर्थ इस्ट मधील वेगवेगळ्या राज्यात पाठवले गेले. त्या वेळी नॉर्थ इस्ट मधील राज्यात अशांतता होती. भारतीय लोकांकडे ते लोक संशयाच्या नजरेने पाहायचे.
      आमचा ग्रुप एकदम    जिंदादिल होता. एकमेकांशी मस्करी चालली होती. आम्ही ज्या गावी जाणार होतो   तो डोंगराळ भाग असल्यामुळे बस शिवाय दुसरा मार्ग नव्हता.आमच्यासाठी एक बस ठरवली गेली. पण झाले असे की आमच्या ग्रुप मध्ये एक सरदारजी होते ते म्हणाले अरे बस मे तो व्हिडिओ वगैरे नहीं है.  इतना लंबा सफर कैसे करेंगे? दुसरा बस लेते है. बाकी सगळे ग्रुप मेम्बर सुद्धा तयार झाले. त्यामुळे आम्ही त्या बस ने जाणे रद्द केले. दुसरी बस मिळण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून आम्ही तिथेच विश्रांती घ्यायची ठरवली.
      दुसरा दिवस उजाडला आणि ती भयानक बातमी आमच्या कानावर आली. जी बस आम्हाला घेऊन जाणार होती त्या बस मधले सगळे प्रवासी माओ वादि लोकांच्या हाती लागले आणि त्यांची निर्घृण हत्या केली गेली होती. ही बातमी कळताच सगळ्याच्या अंगावर काटा आला. त्या क्षणी असे वाटले की आपण त्या बस मध्ये असतो तर आज आपण जिवंत राहिलो नसतो. ही बातमी ऐकून ग्रुप मधील काही जणांना एकदम ताप भरला.    ग्रुप ने त्या सरदारजी ना धन्यवाद दिले की त्यांच्यामुळे आज सगळ्यांचे जीव वाचले. त्यानंतर कळले की   दुसऱ्या खेड्यात गेलेल्या ग्रुप ला सुद्धा स्वतःजवळचे सामान टाकून देऊन पळून यावे लागले होते.

    त्या प्रसंगानंतर आमची अभ्यास सहल सुरक्षित वातावरणात पार पडली. तिथल्या वातावरणाची तिथल्या माणसांची भारताबद्दलची त्यांची मते जाणून घेण्याची आम्हाला संधी मिळाली. पण या एक प्रसंगाने आमच्या सगळ्यांच्या मनात ही अभ्यास सहल कायमची कोरली गेली. आज वीस वर्षे झाली पण अजुनी तो प्रसंग मनात तसाच ताजा आहे.  

1 comment:

मोकळे मन said...

असेच अनुभव शेअर कर