आज ऑफिस मध्ये बसलो होतो. काही काम नव्हते हाताशी. मग काय विचारांची गर्दी झाली होती मनात. टेबलवर ठेवलेल्या नोटपॅडवर मनातले कधी लिहायला लागलो कळलेच नाही.
आज तिची आठवण झाली आणि तिला पत्र लिहावे असे वाटू लागले.
प्रिय यामिनी
तू माझ्या आयुष्यात येऊन २ वर्षे झाली. तशी वर्गात तू नेहमीच दिसत असायचीस. पण तेव्हा आपण फारसे बोलत नव्हतो. पहिले वर्ष असेच गेले आणि दुसऱ्या वर्षात आपण एकमेकांशी बोलू लागलो. फारशी न बोलणारी तू अचानक फार महत्वाची होऊन बसलीस माझ्यासाठी. आपण रोज बोलू लागलो एकमेकांशी आणि एक दिवस अचानक तू विचारलेस का बोलतो रोज आपण. पण याचे उत्तर द्यावे असे मला वाटलेच नाही. पण त्यानंतर मी हळू हळू बोलणे कमी केले. तू नेहमी विचारयचीस मला, काय वाटते माझ्याबद्दल? आणि मी सतत सांगायचे टाळत राहिलो. मी बघत होतो तुझे माझ्यात गुंतत जाणे, पण मी बांधून घेतलो होते स्वतःला. कुठेच गुंतायचं नाही असा विचार करून मी होईल तेवढे तुला तोडून टाकायचा प्रयत्न करत राहिलो. पण हळू हळू तू माझ्या मनात कशी उतरत गेलीस कळलेच नाही मला. पण मी हे सतत नाकारत राहिलो. माझ्या आयुष्यात खास जागा मिळवण्यासाठी तू धडपडत राहिलीस आणि मी नेहमी यावर व्यक्त होणे टाळत राहिलो आणि अचानक तू हि पाठ फिरवलीस माझ्याकडे मी किती हि व्हाट्स अप वर चांगले मेसेज टाकले तरी तू काही व्यक्त होत नव्हतीस. अभ्यास सोडून काही बोलायचे तू सोडून दिलेस. मला भेटायचे सुद्धा तू टाळत राहिलीस.
आज मला माझीच वाक्ये आठवत आहेत. फार गुंता झाला कि कात्री लावून कापून टाकावा. म्हणजे त्रास होत नाही,.
मोबाईलची बेल वाजली आणि माझ्या विचारातून भानावर आलो. ओहो यामिनीचा फोन क्या बात है. आज भेटायला आले तर चालेल का? सर्टिफिकेट घ्यायचे होते. तिने विचारले आणि मी पटकन हो म्हंटले. थोड्याच वेळात ती आली. माझ्यासाठी माझी आवडती चॉकलेट्स आणली होती तिने. ती बघून मन खुश झाले होते माझे.
तिने हलकेच विचारले कि मी काही मागू शकते का? आणि मला आठवण झाली तिच्या मागणीची
काय मागेल आता हि असा मी विचार करू लागलो.? आणि तिने हलकेच सांगितले पाच मिनिट डोळे बंद करून बसाल माझ्यासाठी. थोडेसे विचित्र होते हे पण मी मान्य केले.
५ मिनिट झाले मी डोळे उघडले, ती हसली आणि निघून गेली. मी विचारात पडलो, मला वाटले काहीही मागू शकली असती ती पण मला मनात नि डोळ्यात साठवून गेली ती . अगदी माझा हात हातात घेऊन बघावासा वाटत असून सुद्धा असे काहीच न करता, माझी मर्यादा मोडणार नाही याची काळजी घेणारी
तिच्याबद्दल मला काय वाटतेय हे पत्रात लिहणारा मी तिला प्रत्यक्ष काही सांगायचं प्रयत्न सुद्धा का केला नाही कोण जाणे या प्रश्नाचे उत्तर कायम अनुत्तरित च राहणार असे दिसतेय