Showing posts with label मनातले काही. Show all posts
Showing posts with label मनातले काही. Show all posts

Monday, August 27, 2018

सखीची भेट



विद्युत -हॅलो कुठे आहेस ग ? पोचलीस का? कुठला ड्रेस घातला आहेस?

सखी - हो पोचले. बॉटल ग्रीन रंगाचा पंजाबी घातलाय

विद्युत - हॅलो कशी आहेस

सखी - मस्त

विद्युत - भेळ खाऊया फेमस आहे इथली भेळ. (अरेच्चा  हि फारशी बोलत नाही )

सखी -  चालेल (माहित नाही कसा आहे हा? काय बोललेले चालते याला) 

कुणी पहिली सुरवात करायची बोलायला या विचारात पडले दोघे. सोशल साईटवर  मैत्री झाली आणि मग भेटायचे ठरले. तिच्या मनात धडधड  कसा असेल ?काय बोलेल? जमेल का आपले?  आणि त्याच्या मनात अस्वस्थता. कि कशी असेल ती? आवडेना का मी तिला ? पटेल का आमचे?

शेवटी त्याने हळुवार पणे  बोलायला सुरवात केली आणि मग ती खुलत गेली. वेळ कसा गेला कळलेच नाही. निघताना पाय निघत नव्हता तिचा पण उशीर होतोय असे सांगितल्यावर मात्र नाईलाज झाला. तिच्या डोळ्यातील त्याची ओढ आणि त्याची तिच्यासाठी असलेली आतुरता कळत होती त्यांना. पण असे काही एकमेकांना सांगायचा धीर मात्र झाला नाही त्यांना.


आज खूप दिवसांनी त्यांची भेट ठरली.   तिच्या मनात  आज हि धडधड होतीच.आज तो घरी येणार म्हंटल्यावर काय करू आणि काय नको असे झाले तिला.   बेल वाजली, दार उघडले आणि त्याला बघताच तिच्या छातीत अजून धडधड सुरु झाली. तो घरात आला आणि ती चटकन चहा करते असे म्हणून किचन मध्ये  निघून आली. चहाचे आधण ठेवून ती त्याला नाश्ता देण्यासाठी म्हणून वळली तर तो तिच्या मागे उभा राहून तिला न्याहाळत होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर मस्त लाली पसरली. त्याने मग हळूच तिला मिठीत घेतले व तिच्या ओठावर चुंबनाचा वर्षाव सुरु केला. तिचे अंग मस्त शहरायला लागले. तिने हलकेच त्याच्या कुशीतून सुटका करून घेतली. तो मात्र अजून ओठावरच्या गोड चवीची मजा घेत तिच्याकडे बघत हसत होता. आणि त्याची नजर चुकवत ती मस्त  लाजली.         


        



अस्वस्थ



अगं सांग काय वाटतेय तुला माझ्याबद्दल. ती शांत बसून राहिलीय, काही उत्तरच देत नाही. तिच्या मनात विचारांचे तुफान उठलय. काय सांगू याला मी कि तू आवडतोस पण मग मनात असंख्य प्रश्न आहेतच. तिला निर्णय घेता येत नाही. अचानक ती उठते आणि त्याला सांगते थांबूया आपण इथेच नको पुढे जायला.
 असे म्हणून ती निघून जाते. तो असाच ब्लँक होतो कळतच नाही त्याला काय चुकले आपले. का नकार दिला तिने आणि मग डोळ्यातून आसवांच्या धारा सुरु होतात. खूप वेळ असाच बसून राहिल्यावर तो निघतो घरी जायला आणि मन  अस्वस्थ असते तरी घरी कुणालाच कळु देत नाही काही.

  आज या घटनेला ६ महिने झाले. रोज तो तिच्या फोनची वाट बघतो आणि तिचा फोन येत नाही तेव्हा रोज अस्वस्थ होतो.  आपल्या बाळाकडे लक्ष देताना दिवस कसे गेले ते त्याला कळत नसते. अचानक आज तिचा फोन येतो. तिचा तोच काळजी करणारा आवाज ऐकून छान वाटते त्याला. मग त्याची प्रश्नांची सरबत्ती होते तिच्यावर, कशी आहेस? काय करतेस? तब्येत कशी आहे? इतके दिवसात माझी आठवण सुद्धा झाली नाही? का वागली अशी माझ्याशी?

  राजा!तिचा कातर आवाज ऐकून तो भानावर येतो. मी तुझीच आहे रे पण माझा माझ्यावर विश्वास नव्हता उरला मग काय करणार असे वाटले माझ्यामुळे तुला त्रास नको व्हायला  म्हणून तुझ्यापासून दूर गेले. राणी तुझा विश्वास नाही का ग माझ्यावर? का ग असे वागलीस माझ्याशी? तुझ्याशिवाय एक दिवस मला चैन पडत नव्हते. असे वाटले यावे आणि तुझ्या कुशीत डोके ठेवून शांत पडून राहावे आणि मग तू माझ्या केसातून हात फिरवावा आणि मग मला कुरवाळावे. "ईश्य" काय बोलशील ना तू मला अगदी लाज वाटते हो ऐकले कि. प्रिये केव्हा   येशील भेटायला वाट बघतोय तुझी आतुरतेने. येते हा लवकरच असे राणीने म्हणताच लगेच राजाचे उत्तर "यावे राणीसरकार आपले स्वागत आहे" 

आज किती दिवसांनी कुंडीतील गुलाब मस्त फुलला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हि मस्त आनंदाचे हसू   पसरले.                     



Thursday, November 9, 2017

यामिनी


आज ऑफिस मध्ये बसलो होतो. काही काम नव्हते हाताशी. मग काय विचारांची गर्दी झाली होती मनात.  टेबलवर ठेवलेल्या नोटपॅडवर मनातले कधी लिहायला लागलो कळलेच नाही.
  आज तिची आठवण झाली आणि तिला पत्र लिहावे असे वाटू लागले.

प्रिय यामिनी

तू माझ्या आयुष्यात येऊन २ वर्षे झाली. तशी वर्गात तू नेहमीच दिसत असायचीस. पण तेव्हा आपण फारसे बोलत नव्हतो. पहिले वर्ष असेच गेले आणि दुसऱ्या वर्षात आपण एकमेकांशी बोलू लागलो. फारशी न बोलणारी तू अचानक फार महत्वाची होऊन बसलीस माझ्यासाठी. आपण रोज बोलू लागलो एकमेकांशी आणि एक दिवस अचानक तू विचारलेस का बोलतो रोज आपण. पण याचे उत्तर द्यावे असे मला वाटलेच नाही. पण त्यानंतर मी हळू हळू बोलणे कमी केले. तू नेहमी विचारयचीस मला, काय वाटते  माझ्याबद्दल? आणि मी सतत सांगायचे टाळत  राहिलो. मी बघत होतो तुझे माझ्यात गुंतत जाणे, पण मी बांधून घेतलो होते स्वतःला. कुठेच गुंतायचं नाही असा विचार करून मी होईल तेवढे तुला तोडून टाकायचा प्रयत्न करत राहिलो. पण हळू हळू तू माझ्या मनात कशी उतरत गेलीस कळलेच नाही मला. पण मी हे सतत नाकारत राहिलो. माझ्या आयुष्यात खास जागा मिळवण्यासाठी तू धडपडत राहिलीस आणि मी नेहमी यावर व्यक्त होणे टाळत  राहिलो  आणि अचानक तू हि पाठ फिरवलीस माझ्याकडे मी किती हि व्हाट्स अप वर चांगले मेसेज टाकले तरी तू काही व्यक्त होत नव्हतीस. अभ्यास सोडून काही बोलायचे तू सोडून दिलेस. मला भेटायचे सुद्धा तू टाळत राहिलीस.

आज मला माझीच वाक्ये आठवत आहेत. फार गुंता झाला कि कात्री लावून कापून टाकावा. म्हणजे त्रास होत नाही,.

मोबाईलची बेल वाजली आणि माझ्या विचारातून भानावर आलो. ओहो यामिनीचा फोन क्या बात है. आज भेटायला आले तर चालेल का? सर्टिफिकेट घ्यायचे होते. तिने विचारले आणि मी पटकन हो म्हंटले.  थोड्याच वेळात ती आली. माझ्यासाठी माझी आवडती चॉकलेट्स आणली होती तिने. ती बघून मन खुश झाले होते माझे.
तिने हलकेच विचारले कि मी काही मागू शकते का? आणि मला आठवण झाली तिच्या मागणीची
काय मागेल आता हि असा मी विचार करू लागलो.? आणि तिने हलकेच सांगितले पाच मिनिट डोळे बंद करून बसाल माझ्यासाठी. थोडेसे विचित्र होते हे पण मी मान्य केले.
   ५ मिनिट झाले मी डोळे उघडले, ती हसली आणि निघून गेली. मी विचारात पडलो, मला वाटले  काहीही मागू शकली असती ती पण मला मनात नि डोळ्यात साठवून गेली ती . अगदी माझा हात हातात घेऊन बघावासा वाटत असून सुद्धा असे काहीच न करता, माझी मर्यादा मोडणार नाही याची काळजी घेणारी
    तिच्याबद्दल मला काय वाटतेय हे पत्रात लिहणारा मी तिला प्रत्यक्ष काही सांगायचं प्रयत्न सुद्धा का केला नाही कोण जाणे या प्रश्नाचे उत्तर कायम अनुत्तरित च राहणार असे दिसतेय 
                           

Tuesday, June 27, 2017

भेट


आजचा दिवस प्रीतीसाठी खूप खास होता. आज तिची भेट तिच्या आवडत्या लेखकाशी होणार होती. भेट कशी होईल, काय बोलतील याच्याबद्दल तिच्या मनात  उत्सुकता  आणि हुरहूर दोन्ही होती. काही दिवसापुर्वी त्यांची सोशल मीडिया वरून ओळख झाली होती.  लेखक म्हणून समाजात ओळख असलेले ते उत्तम चित्रकार आणि कवी सुद्धा आहेत हे तिला त्यांच्या संवादातून कळले आणि मग त्यांच्याशी छान  जोडले गेल्यासारखे तिला वाटायला लागले.
  खूप गप्पा झाल्यावर मग त्यांना एकमेकांचे मित्र मैत्रीण असल्यासारखे वाटू लागले. आणि काहीच दिवसात त्यांनी तिला भेटीला येण्याचे आमंत्रण दिले.  त्यांनी आपल्याला आमंत्रण दिले याचे तिला आश्चर्य वाटत राहिले
    ती त्यांच्या घरी गेली तिचे  यथोचित स्वागत झाले आणि मग सुरु झाल्या मनमोकळ्या गप्पा. त्या गप्पांना विषयांचे बंधन नव्हते. वेगवेगळ्या विषयांचे त्यांचे ज्ञान पाहून प्रीती चकित झाली होती. आणि मग गप्पांच्या शेवटी त्यांनी तिचे चित्र काढण्याची परवानगी मागितली आणि तिला काही सुचेना कि काय उत्तर द्यावे. एकाच दिवशी एवढे सुखद धक्के मिळाल्यामुळे ती खूप आनंदी आणि आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासात तिचे एक सुंदर चित्र तिला पाहायला मिळाले. आणि त्याहीपेक्षा त्यांनी ते चित्र त्यांची  स्वाक्षरी करून तिला भेट दिले याचा तिला खूप आनंद झाला .
    प्रीती च्या आयुष्यातील हा एक अप्रतिम दिवस होता. लेखकाशी भेट, मनमोकळ्या गप्पा आणि मग तिच्या चित्राची तिला मिळालेली भेट. अगदी सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस. तिच्या वाचनाचे आणि कवितांचे कौतुक त्यांनी केले त्यामुळे आज खुश होती ती.
   आता तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. कधी एकदा हि गोष्ट मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सांगते याची ती वाट बघत होती. आणि सोशल मीडियावर हि बातमी शेअर केल्यावर फोन आणि  मेसेजेस चा पाऊस पडेल याची तिला आता खात्री वाटू लागली                  

Friday, July 29, 2016

गॉसिप

कलियुग असो कि कोणतेही युग असो गॉसिप म्हंटले कि बायका हे समीकरण कायम असते. एकाच्या गोष्टी ऐकून दुसऱ्याला सांगितल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही असे म्हणतात. पण या सगळ्या गॉसिप वाल्या बायकांचे आद्य गुरु कोण तर चक्क एक पुरुष. काय म्हणता पटत नाही कमाल आहे, हा पुरुष म्हणजे नारद. सतत भ्रमण करणे आणि सगळीकडच्या बातम्या सांगणे याशिवाय त्या बातम्या ऐकून समोरची व्यक्ती कशी आश्चर्यचकित होई याचे जिवंत उदाहरण म्हणजे नारदमुनी. त्यांचे टोपण नाव सुद्धा होतेच कि कळलाव्या म्हणजेच भांडण लावून देणारे. पण कधीतरी त्यांच्यावर हि अशी वेळ येत असेल कि कुठून आपण या प्रसंगात पडलो.
गॉसिप करणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे हे एक बुमरँग सारखे शस्त्र आहे जे उलटले तर तुमच्या चांगल्या गोष्टींचा नाश करायला कारणीभूत ठरू शकते.       
     

Tuesday, September 15, 2015

खेळ - आयुष्याचा आरसा



        आज टी व्ही वर खो खो चा खेळ  बघताना मन एकदम भूतकाळात गेले. शाळेत असताना मी खो खो खेळत होते त्याची एकदम आठवण झाली. तो खेळ बघताना अगदी मीच तिथे खेळत असावे अश्या प्रकारे मी ओरडत होते , खेळाडू आउट झाला कि हळहळत हि होते. तेव्हा जे जमले नाही ते आता जगायचा प्रयत्न करत होते. आणि मग वाटले कि खेळ आपल्याला किती मदत करतो आनंद दुख अवहेलना सगळे पचवण्याची शक्ती देतो. जो खेळाडू हे सगळे पचवू शकतो तोच मोठा होऊ शकतो. आणि मग खेळ पाहताना आपण अगदी सिनेमा सारखे रंगून जातो जसे कि आपणच आहोत त्याचे हिरो किवा हिरोइन. मग तो खेळ कुठला हि असो. कब्बडी किवा टेनिस. जेव्हा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे असतात तेव्हा आपला जीव नुसता वर खाली होत असतो प्रत्येक क्षण कसोटीचा वाटत असतो. मग तो पेस असो कि सानिया किवा कुस्तीपटू असो. आपल्याला वाटते कि आपलाच देश जिंकावा  आणि गम्मत म्हणजे तो जिंकला नाही कि वाटते कि अरेरे काय झाले हे ! आपली हि अवस्था तर जे खेळतात त्याचे काय होत असेल. मनात हुरहूर भीती आणि देशासाठी जिंकण्याची धडपड दिसून येत असते. आणि मग जिंकण्यासाठी किती क्लुप्त्या लढवणे.
      पण एक नक्की आपल्यासारखे  चाहते कुठेच मिळणार नाहीत. जिंकलो कि डोक्यावर घेणारे आणि हरलो कि खूप चिडणारे. सगळेच थोडे टोकाचे . पण याच दडपणाने खेळ चांगला होतो  म्हणतात.
       वर्षानु वर्षे बरेच वेग वेगळे खेळ आपण खेळत आलो आहोत  जसे कि  भातुकली , माझे पत्र हरवले ,काचा पाणी , कांदा फोडी , चमचा गोटी, तीन पायाची शर्यत ,  खो खो , कबड्डी , धावणे .  चेस ,बास्केट बॉल,  व्होलि बॉल, क्रिकेट , नेमबाजी ,टेनिस, फुट बॉल

आणि गम्मत म्हणजे हे खेळ खेळता खेळता आपण आयुष्यातील वेग वेगळ्या गोष्टी करायला शिकतो. हे सगळे खेळ आपल्या आयुष्यात रंगत तर आणतात च पण आयुष्य आनंदाने कसे जगावे हे हि शिकवतात.