Monday, July 4, 2016

कविता

            आज एक कविता सुचली विचार केला त्याला वाचून दाखवावी. तो बिझी होता मग दुसऱ्या मित्रांना वाचून दाखवली त्यांना आवडली. दिवसभर या आनंदात होते मी. आणि अचानक त्याचा संध्याकाळी फोन आलाकाय छान वाटले मला, मी खुश   इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग त्याला सांगितले की एक कविता केलीय वाचून दाखवू का? तो ही खुश बरेच दिवसांनी तो कविता ऐकत होता. मागची कविता ऐकून सुद्धा महिना झाला होता. कविता वाचून दाखवली मी आणि विचारले कशी आहे तर तो शांत उत्तरच देईना. मग म्हणाला तुला वाईट वाटेल नको राहू दे. मग मी विचारले आवडली नाही का तर म्हणाला कविता तशी बरी आहे पण तुझी  पहिल्यांदा कविता ऐकली होती त्याची मजा यात नाही. मी विचारले म्हणजे काय. तर त्याचे म्हणणे असे की तुझ्या आजच्या कवितेत    कुठे तरी काहीतरी मिसिंग आहे काहीतरी. काय मिसिंग आहे असे विचारले तर म्हणतो की माझ्या कवितेचा आत्मा हरवलाय. अरे बापरे मला तर ऐकून धक्काच बसला. असे वाटले कुठून याला कविता ऐकवली. तो म्हणतो कविता संग्रह साठी फिट नाही ही कविता. मग मी म्हंटले कविता संग्रहासाठी नाही लिहित मी कविता. मी लिहिते स्वतःसाठी.असे म्हणून फोन ठेवून दिला मी. असा राग आला आणि खूप वाईट ही वाटले. असे वाटले काही कविता लिहू नये. काय उपयोग लोकांना आवडत नसेल तर. मग काय ठेवून दिली कवितेची वही. आणि मग व्हाट्स अँप च्या फॉरवर्ड केलेल्या कविता वाचत बसले. मग दुसऱ्या मित्राने समजावले अग प्रत्येकाची मते वेगळी एवढ्यात नको नाराज होऊ. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे सुधरायला मदत होते.मी  हे वाचता क्षणी माझी कळी खुलली हो.               

1 comment:

मोकळे मन said...

प्रत्येकाने चांगलेच बोलले पाहिजे असे ठरवून लिहू नकोस ,स्वतःच्या आनंदासाठी लिही,